Posts

Showing posts from January, 2016

उपक्रम - "चला कविता करूया"

Image
"चला कविता करूया" उपक्रमासाठी एकूण मुलांमधून कल्पनाशक्ती चांगली असणारी मुले निवडावी. * गद्य व पद्य यातील फरक काय हे मुलांना विचारून कवितेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे . *मुलांना आजपर्यंत आवडलेल्या काही कविता म्हणावयास सांगाव्या.आपण काही निवडक कविता ऐकवाव्यात. * या कवितांमधले यमकदर्शक शब्द कोणते ते विचारावे.ज्यामुळे कविता लयीत वाटते. * सर्वांना काही मराठी यमक दर्शक शब्द  लिहिण्यास सांगावे.उदा.वारा,गारा,पारा,चारा,इ. *लिहिलेल्या यमकदर्शक शब्दांना गुंफून कवितेच्या फक्त ४ ओळी कल्पनेसह लिहिण्यास सांगावे.व मार्गदर्शन करावे *सुंदर ओळी व कल्पना मांडणारांचे कौतुक करावे व लिहिलेल्या ओळीना चाल लावण्यास सांगावे.व त्यासाठी मदत करावी. *आता मुलांचे प्रत्येकी ४-४ चे गट करावेत. *प्रत्येक गटाला वेगळा विषय द्यावा. उदा.आई,पाऊस,निसर्ग,भारत देश,आपले गाव,इ. * त्यावर आधारीत कवितेच्या ओळी शक्य होईल तितक्या लिहीण्यास सांगाव्या व या ओळी चालीत बसवण्यास सांगावे. * सुंदर कविता व चाल असणाऱ्या गटाचे अभिनंदन करावे. *गृहपाठ - प्रत्येक विद्यार्थ्याला आपला आवडीचा विषय घेऊन त्यावर आधारीत कव

" महात्मा फुले "

Image
महात्मा  जोतीबा फुले  ( एप्रिल ११ ,  इ.स. १८२७  - नोव्हेंबर २८ ,  इ.स. १८९० ) हे  मराठी   लेखक , विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी  सत्यशोधक समाजाची स्थापना केली.  शेतकरी  आणि  बहुजन  समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली  शाळा  १८४८ साली  पुणे  येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. Quick facts : जन्म:, मृत्यू: ... बालपण आणि शिक्षण जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण ( सातारा ) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार  पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात

"भारतीय प्रजासत्ताक दिन"

Image
भारतीय प्रजासत्ताक दिवस  हा  भारताच्या प्रजासत्ताकात  दरवर्षी  जानेवारी २६  रोजी पाळला जाणारा  राष्ट्रीय दिन  आहे.  भारताची राज्यघटना  घटना समितीने  २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९  रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी   इ.स. १९५०  रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी  २६ जानेवारी  इ.स. १९३०  रोजी लाहोर अधिवेशनात  तिरंगा  फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः  स्वातंत्र्य दिवस :  ऑगस्ट १५  व  गांधी जयंती : ऑक्टोबर २ ). ह्या दिवशी भारताची राजधानी,  नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मा

विद्यार्थी लाभाच्या योजना

|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||| 📖 विद्यार्थी लाभाच्या योजना 📖 ====================== 👉 उपस्थिती भत्ता ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली ====================== 👉 मोफत गणवेश योजना ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 मोफत लेखन साहित्य ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 शालेय पोषण आहार ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज ====================== 👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज ====================== 👉 मोफत पाठ्यपुस्तके ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी ====================== 👉 मोफत गणवेश योजना ई . १ली ते ८ वी सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकां