उपक्रम - "चला कविता करूया"
"चला कविता करूया" उपक्रमासाठी एकूण मुलांमधून कल्पनाशक्ती चांगली असणारी मुले निवडावी. * गद्य व पद्य यातील फरक काय हे मुलांना विचारून कवितेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे . *मुलांना आजपर्यंत आवडलेल्या काही कविता म्हणावयास सांगाव्या.आपण काही निवडक कविता ऐकवाव्यात. * या कवितांमधले यमकदर्शक शब्द कोणते ते विचारावे.ज्यामुळे कविता लयीत वाटते. * सर्वांना काही मराठी यमक दर्शक शब्द लिहिण्यास सांगावे.उदा.वारा,गारा,पारा,चारा,इ. *लिहिलेल्या यमकदर्शक शब्दांना गुंफून कवितेच्या फक्त ४ ओळी कल्पनेसह लिहिण्यास सांगावे.व मार्गदर्शन करावे *सुंदर ओळी व कल्पना मांडणारांचे कौतुक करावे व लिहिलेल्या ओळीना चाल लावण्यास सांगावे.व त्यासाठी मदत करावी. *आता मुलांचे प्रत्येकी ४-४ चे गट करावेत. *प्रत्येक गटाला वेगळा विषय द्यावा. उदा.आई,पाऊस,निसर्ग,भारत देश,आपले गाव,इ. * त्यावर आधारीत कवितेच्या ओळी शक्य होईल तितक्या लिहीण्यास सांगाव्या व या ओळी चालीत बसवण्यास सांगावे. * सुंदर कविता व चाल असणाऱ्या गटाचे अभिनंदन करावे. *गृहपाठ - प्रत्येक विद्यार्थ्याला आपला आवडीचा विषय घेऊन त्यावर आधारीत कव